Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / शेगाव आरपीएफच्या सतर्कतेमुळे नाबालिग मुलाला त्याच्या पालकांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यात यश

शेगाव आरपीएफच्या सतर्कतेमुळे नाबालिग मुलाला त्याच्या पालकांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यात यश

रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) ने पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यनिष्ठा आणि सतर्कतेचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत एका नाबालिग मुलाला सुरक्षित त्याच्या पालकांपर्यंत पोहोचवले. रेल्वे सुरक्षा दलाला रेल्वे संपत्ती, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे. याचबरोबर, “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” या मोहिमेअंतर्गत हरवलेल्या मुलांना त्यांचे पालक मिळवून देण्याचे कार्यही आरपीएफ करत आहे.
ही घटना दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात घडली. ड्यूटीवर असलेल्या आरपीएफ कर्मचारी शेख नावेद यांना स्टेशन परिसरात एक नाबालिग मुलगा संशयास्पद अवस्थेत फिरताना दिसला. तत्काळ पुढाकार घेत, त्यांनी मुलाशी विचारपूस केली. त्यावेळी मुलाने आपले नाव सोहम उल्हास भारती (वय 12 वर्षे, रा. अकोला) असल्याचे सांगितले. त्याने सांगितले की, तो आपल्या पालकांसोबत शेगाव दर्शनासाठी आला होता, पण गर्दीत तो हरवून गेला.
आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्या मुलाला सहानुभूतीने आरपीएफ पोलीस ठाण्यात नेले आणि त्याच्याकडून सविस्तर माहिती घेतली. सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण भरने यांनी स्टेशनवर सार्वजनिक उद्घोषणा करून त्या मुलाच्या पालकांना माहिती देण्याचे प्रयत्न केले. थोड्याच वेळात मुलाचे वडील उल्हास शामराव भारती (वय 45 वर्षे) आरपीएफ पोलीस ठाणे, शेगाव येथे पोहोचले. मुलाने आपल्या वडिलांना ओळखल्यानंतर, दोन पंचांच्या साक्षीने आवश्यक सर्व औपचारिकता पूर्ण करून त्या मुलाला त्याच्या वडिलांकडे सुरक्षित सुपूर्त करण्यात आले.
मुलाच्या वडिलांनी आरपीएफच्या टीमचे त्यांच्या तत्परतेबद्दल आणि मानवीय दृष्टिकोनाबद्दल आभार मानले. त्यांनी सांगितले की, शेगाव आरपीएफच्या सतर्कतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे त्यांचा मुलगा सुखरूप परत मिळाला.
आरपीएफची “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” मोहीम रेल्वे सुरक्षा दल केवळ रेल्वे परिसराची सुरक्षा करत नाही, तर समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडत अनेकदा हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्यही करते. “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत, आरपीएफने आजपर्यंत देशभरात हजारो मुलांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र करण्यास यश मिळवले आहे.
रेल्वे सुरक्षा दल प्रवाशांना आवाहन करते की, जर रेल्वे परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा परिस्थिती दिसल्यास किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी त्रस्त अवस्थेत आढळल्यास तातडीने नजीकच्या आरपीएफ पोस्टला कळवा. आपली सतर्कता कोणाच्या मदतीचे कारण ठरू शकते.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, शेगाव


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

जोगलखोरी येथे भिल्ल समाजाचे आदिवासी  वृद्ध व विधवा महिलांना शासकीय योजनेचा लाभ

भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी येथील भिल्ल समाजाचे आदिवासी वृद्ध व विधवा महिलांना भुसावळ तालुका महसुल प्रशासनाने …

Leave a Reply