
जम्मू कश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली, लोकभावानेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले व दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हल्ला करून दहशतवादी पाकिस्तानला चांगला धडा शिकवला.
भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रावेर लोकसभा अंतर्गत भुसावळ शहरात आज मंत्री मा.ना.श्री.गिरीषजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थित भव्य “तिरंगा रॅली” चे आयोजन करण्यात आले असता या तिरंगा रॅलीत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सहभागी होऊन ‘भारत माता की जय, जय हिंद’ अशा घोषणांनी भारतीय लष्कराचा विजयोत्सव साजरा केला.
यावेळी मंत्री ना. गिरीषजी महाजन व केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह वस्त्रोद्योग मंत्री ना. संजयजी सावकारे, आ. अमोल हरिभाऊ जावळे, चंद्रकांत बाविस्कर, रमेश मकासरे, उमेश नेमाडे तसेच सर्व पक्षीय जिल्हा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते व भुसावळकर उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके भुसावळ
Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines
Subscribe to get the latest posts sent to your email.