
मुंबई : साधारण कार्यकर्त्यापासून ते भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रवास हा संघर्ष, निष्ठा आणि अथक मेहनतीची जिवंत कहाणी आहे. एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता पक्षाच्या विचारांसाठी रात्रंदिवस झटत, पक्षाच्या प्रत्येक लहान-मोठ्या कामात स्वतःला झोकून देत आज या टप्प्यावर पोहोचतो, हे स्वतः बावनकुळे यांनी सुद्धा स्वप्नातही कधी विचार केला नव्हता.
भावनांची सुरुवात…
आपल्या पत्राची सुरुवात करताना त्यांनी कविवर्य ना. धो. महानोर यांच्या ह्या ओळी उद्धृत केल्या:
“कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे !!”
या ओळी त्यांच्या मनातील भावनांची साक्ष आहेत…
आपल्या आयुष्याच्या साधेपणातून आलेली ही मोठी संधी… जणू काही देवानेच दिलेले वरदान.
राजकीय प्रवासाची सुरुवात…
35 वर्षांपूर्वी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्यासाठी त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाची सुरुवात केली. भिंती रंगवणे, पत्रके वाटणे, गावोगाव सायकलने किंवा पायी फिरून पक्षाची तत्त्वे पोहचवणे… हे त्यांचे रोजचे काम होते. त्या छोट्या छोट्या पावलांनी त्यांनी मोठी झेप घेतली.
12 ऑगस्ट 2022 – एक ऐतिहासिक दिवस
12 ऑगस्ट 2022 रोजी जेव्हा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली, तेव्हा आनंदाच्या बरोबरच जबाबदारीचं ओझं देखील त्यांच्या खांद्यावर आलं. अनेक दिग्गज नेत्यांनी भूषवलेलं हे पद… उत्तमरावजी पाटील, गोपीनाथराव मुंडे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांची परंपरा… त्या परंपरेला योग्य तो मान देत त्यांनी पदभार स्वीकारला.
संघर्ष आणि यशाचा प्रवास
आपल्या अध्यक्षीय काळात त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. “चांदा ते बांदा” पर्यंत, प्रत्येक बूथवरच्या कार्यकर्त्याला बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संघटन पर्व राबवत, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातील सर्वात मोठा सदस्यसंख्या असलेला पक्ष बनवलं, ही बाब त्यांच्या कार्यकुशलतेची साक्ष आहे.
अपयश आणि आत्ममंथन…
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानं काहीसा दुःख होतं, पण त्यांनी हार न मानता आत्ममंथन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली आणि विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवला.
अध्यक्षीय कार्यकाळातील शिकवण…
त्यांचा कार्यकाळ फक्त पद आणि जबाबदारी यापुरता मर्यादित नव्हता… तो एका कार्यकर्त्याच्या जिद्दीची, संयमाची, चिकाटीची आणि नेतृत्वगुणांची परीक्षा होती. त्यांनी आपल्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला नेहमीच सन्मान दिला आणि कधी चुकून जर रागावलो असेल, कुणाला मन दुःखी केलं असेल तर त्यांनी सर्वांची मनापासून माफी मागितली. हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मोठेपण दर्शवतं.
नवी जबाबदारी… नवा प्रवास…
आज ते महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारत आहेत. याच अध्यक्षीय प्रवासाच्या अनुभवाचा उपयोग आता ते जनतेसाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी करतील, याची खात्री आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत सांगितले की, “त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन.”
“राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः”
या मूलमंत्राला आपल्या हृदयाशी बाळगत बावनकुळे यांनी तीन दशके पक्षसेवेत घालवली. आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाने ते पुढेही असेच प्रामाणिकपणे काम करत राहतील, असा विश्वास त्यांनी आपल्या शेवटच्या ओळींमधून व्यक्त केला.
शेवटी…
Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines Khabar 24 Express Indias Leading News Network, Hindi News – Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines, current affairs, cricket, sports, business and cinema, Latest Hindi News, Breaking News in Hindi, Bollywood Gossip, Bollywood News, Top Hindi News Channel, Khabar 24 Express Live TV, Khabar24, Khabar24 Express