Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळात भाजपाला मोठा धक्का; मंत्री संजय सावकारेंची सत्ता उलथवली, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांचा निर्णायक विजय

भुसावळात भाजपाला मोठा धक्का; मंत्री संजय सावकारेंची सत्ता उलथवली, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांचा निर्णायक विजय

ब्यूरो रिपोर्ट | आकाश ढाके | भुसावळ न्यूज | खबर 24 एक्सप्रेस

भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मोठा राजकीय धक्का बसला असून, सत्ताधारी मंत्री संजय सावकारे यांना जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे.

नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे यांनी भाजपाच्या उमेदवार व संजय सावकारेंच्या पत्नी रजनी सावकारे यांचा १,८४७ मतांनी पराभव केला.

निवडणूक निकालानुसार गायत्री भंगाळे यांना ४२,२३४ मते मिळाली, तर रजनी सावकारे यांना ४०,३८७ मते मिळाली. सत्तेचा प्रभाव, प्रशासकीय यंत्रणा आणि संपूर्ण ताकद वापरूनही भाजपाला भुसावळमधील सत्ता कायम राखता आली नाही. या निकालामुळे स्थानिक पातळीवर भाजपच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या निवडणुकीत मतदारांनी विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सत्ताधाऱ्यांना नाकारल्याचे चित्र दिसून आले. “सत्ता असूनही जनतेचा विश्वास मिळाला नाही” असा स्पष्ट कौल मतपेटीतून दिला गेल्याची चर्चा शहरात होत आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) साठी हा विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. या निकालामुळे भुसावळ शहरातील राजकीय समीकरणे बदलली असून, आगामी स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारणावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी शहरात आनंदोत्सव साजरा केला, तर भाजप गोटात शांतता आणि निराशेचे वातावरण पाहायला मिळाले. भुसावळच्या जनतेने या निवडणुकीतून “सत्ता नव्हे, काम महत्त्वाचे” असा ठाम संदेश दिला आहे.


ब्यूरो रिपोर्ट : आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

Mumbai Family Death Mystery: Watermelon Not the Cause Behind 4 Deaths, Forensic Probe Reveals Shocking Details

Mumbai Family Death Mystery: Watermelon Not the Cause Behind 4 Deaths, Forensic Probe Reveals Shocking Details

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading