Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / NCERT च्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; पाठ्यपुस्तक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

NCERT च्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; पाठ्यपुस्तक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने राज्यासह देशभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट NCERT पाठ्यपुस्तक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

वादाचे कारण काय ?

NCERT कडून राजस्थानमधील काही राजपूत शासकांच्या हरकतीचा तसेच जैसलमेरचा भाग मराठा साम्राज्यात दर्शविल्याच्या तांत्रिक वादाचा हवाला देत संबंधित नकाशा अभ्यासक्रमातून हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एका त्रुटीच्या कारणावरून संपूर्ण नकाशा वगळणे म्हणजे इतिहासाशी अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

जावळे यांची ठाम भूमिका –

शिशिर जावळे यांनी पंतप्रधान Narendra Modi तसेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे निवेदन सादर करत पुढील मागण्या केल्या आहेत—
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवणारे NCERT पाठ्यपुस्तक मंडळ त्वरित बरखास्त करावे
इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी
अचूक आणि सुधारित नकाशा तात्काळ पुस्तकात समाविष्ट करावा
जावळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, “छत्रपती शिवाजी महाराज पासून ते बाजीराव पेशवे यांच्यापर्यंत मराठ्यांनी दिल्लीपासून बंगालपर्यंत सत्ता गाजवली. हा गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही.”

ऐतिहासिक संदर्भ –

इतिहासकारांच्या मते, १८ व्या शतकात मराठा साम्राज्याचा विस्तार कटकपासून अटकेपारपर्यंत पोहोचला होता. उत्तर भारतात दिल्लीच्या गादीचे रक्षणकर्ते म्हणून मराठ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळे अशा कालखंडाचा नकाशा पाठ्यपुस्तकातून वगळणे म्हणजे विद्यार्थ्यांना अपूर्ण माहिती देण्यासारखे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

प्रमुख मागण्या –

हटवलेला नकाशा सन्मानाने पुन्हा समाविष्ट करावा
इतिहासाचे विकृतीकरण टाळण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमावी
महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित बाबींवर केंद्र सरकारने लक्ष ठेवावे
या वादामुळे केंद्र सरकार आणि NCERT यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

“कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

"कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading