
मुंबई प्रतिनिधी – आकाश ढाके : राज्याच्या राजकीय वातावरणात रंग चढवणारी बातमी अखेर आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज (४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजवला आहे. यासोबतच राज्यभर आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे.
राज्यातील अनेक नगरपालिका आणि नगरपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ मध्येच संपला होता. मात्र, कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षण वादामुळे निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या गेल्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जानेवारी २०२६ पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया गतीमान झाली आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली की, पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. अधिसूचना आजच (४ नोव्हेंबर) जारी होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर, मतदान २ डिसेंबर, आणि मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल.
राज्य निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपला प्रचार मोड ऑन केला आहे. उमेदवारांच्या घोषणांपासून ते आघाड्यांच्या चर्चांपर्यंत, पुढील काही दिवस महाराष्ट्रात स्थानिक राजकारणाचे तापलेले वातावरण पाहायला मिळणार आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, मुंबई
Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines Khabar 24 Express Indias Leading News Network, Hindi News – Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines, current affairs, cricket, sports, business and cinema, Latest Hindi News, Breaking News in Hindi, Bollywood Gossip, Bollywood News, Top Hindi News Channel, Khabar 24 Express Live TV, Khabar24, Khabar24 Express