Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ, प्रतिनिधी : शहरातील तीव्र पाणीटंचाई, नियोजनशून्य पाणीपुरवठा आणि पाणीपुरवठा विभागाच्या कथित अनास्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते उमेश नेमाडे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.
तसेच प्रशासनाकडून पाणीटंचाईचे नेमके कारण, अडथळे आणि पाणीपुरवठा पूर्ववत कधी होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याबद्दलही निवेदनातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बंधाऱ्यात पाणी उपलब्ध झाल्यानंतरही कोणत्या भागात, कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी पाणीपुरवठा केला जाणार, याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात पाणीटंचाईस जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणे, नियमित व पारदर्शक पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तातडीने जाहीर करणे, नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठ्याची हमी देणे आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7